*अनोळखी मृत व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन

       लातूर,दि.1,(जिमाका):-  उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमृ नंबर 21/2025 कलम 144 बीएनएसमधील अनोळखी 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती अंगात रेघाळा शर्ट काळसर रंगाची पॅन्ट पांढरी बनीयन हा पिंपरी शिवारातील तलावात बुडून मरण पावला आहे. तरी या वर्णनाचा व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी (मो.क्र. 9560632424) , सोपनि विशाल एन. बहात्तरे (मो.क्र. 9657718232), डी.बी. पडिले (मो. न. 9764220633) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*आदित्य शिक्षण संस्थेच्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाले...!*

           21 व्या शतकाच्या सुरुवातीस मराठवाड्यातील अति दुष्काळी बीड जिल्ह्यात तंत्रशिक्षणाच्या ज्ञानगंगाची सुरुवात ज्यांनी केली असे थोर व्यक्तीमत्त्व म्हणजे *मा. श्री. सुभाषचंद्रजी (भाऊ) सारडा साहेब* मराठवाड्यातील बीड जिल्हा हा अतिदुर्गम व दुष्काळी तसेच ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून याची ओळख 20 व्या शतकात उदयास आली. या ओळखीने उदयास आलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, वैद्यकीय शिक्षण, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यायचं म्हटलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी तर सोडाच पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोठेही उपलब्ध नव्हते. अशा वेळेस बीड जिल्ह्यामधील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला उच्च व तंत्र शिक्षण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हावे. म्हणून मा. भाऊसाहेब यांनी सन 2000 मध्ये आदित्य शिक्षण संस्थेची स्थापना करून, शैक्षणिक वर्ष 2000-2001 मध्ये आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रोपटे लावले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांना संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या पदवीचे शिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आले.
     मा. भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या बीड जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग या माध्यमातून चांगल्या पद्धतीने जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू झाला. शिक्षण संस्थेत बीड जिल्ह्यामधील मराठवाड्यातील राज्यातील तसेच परराज्यातील जम्मू-काश्मीर, बिहार अशा अनेक ठिकाणीचे विद्यार्थीही प्रवेश घेऊ लागले. संस्थेमार्फत मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकास होण्यास प्रारंभ झाला. पुढे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत संस्थेमार्फत कृषी, कृषी अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी, व जैवतंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची नवीन चार महाविद्यालय संस्थेमार्फत बीड शहरात सुरू करण्यात आली. आता विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबरच कृषी, कृषी अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी व जैवतंत्रज्ञान शास्त्राचे शिक्षण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्याला इतर ठिकाणी जाण्यास लागणारा खर्च व इतर गोष्टींची सुविधा खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाल्या त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आदित्य शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन आपला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून योग्य पदावर कार्यरत होऊन कार्य करू लागली.
      मा. भाऊसाहेबांच्या मनामध्ये अभियांत्रिकी व कृषी अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून  वैद्यकीय व व्यवस्थापनशास्त्र शिक्षण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे. म्हणून मा. भाऊसाहेबांनी वैद्यकीय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाची सुरुवात केली. या अंतर्गत विद्यार्थ्याला दंत, आयुर्वेदिक व व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे पदवीचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्याला अभियांत्रिकी पदवी बरोबरच विद्यार्थ्याला कमी कालावधीमध्ये रोजगार निर्मिती व्हावी. म्हणून मा. भाऊसाहेबांनी अभियांत्रिकी पदविका (Diploma Polytechnic) अभ्यासक्रमाची सुरुवात केली. या मार्फत विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन अभ्यासक्रमास प्रवेश घेईल व तीन वर्षात पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून नामांकित कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्य करण्यास तयार होईल. विद्यार्थ्याला कमी वयात रोजगार निर्मिती होई यामुळे पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला संस्थेमध्ये आता अभियांत्रिकी पदवी व पदविका, वैद्यकीय दंत शिक्षण, आयुर्वेदिक, कृषी, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र अशा सर्व अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा ओढा पाहून मा. भाऊसाहेबांच्या आशा द्विगुणीत झाल्या त्यांच्या मनामध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांतर्गत चालू असलेल्या शैक्षणिक कार्यास उंच भरारी मिळू लागली. संस्थेमध्ये असंख्य विद्यार्थी शिकत आहेत. हे पाहून मा. भाऊसाहेबांचे मन हर्ष उल्हासित झाले. 
       शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आदित्य शिक्षण संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आणि या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये मा. भाऊसाहेब यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाला आहे. संस्थेमध्ये सध्या बीटेक, एमटेक, बीडीएस, एमडीएस, बीएएमएस (आयुर्वेदिक), अभियांत्रिकी पदविका, (Diploma Polytechnic) एमबीए, एमसीए, कृषी, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड टेक्नॉलॉजी, डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी, फार्म डी, बीएससी नर्सिंग, जी एन एम,  फिजिओथेरपी, डीएड, बीएड, बीएससी, एमएससी व आयटीआय अशा अभ्यासक्रमांतर्गत प्रतिवर्षी हजारो विद्यार्थी पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र घेऊन उत्तीर्ण होत आहेत.  जिल्ह्यात, राज्यात परराज्यात व देशात अनेक ठिकाणी प्रथम वर्ग अधिकारी, तसेच नामांकित कंपनीत कार्यरत असून, सक्षम उद्योगांतर्गत स्वबळावर स्वतःच्या पायावर उभा आहेत. याचा मा. भाऊसाहेबांना सार्थ अभिमान आहे.
मा. भाऊसाहेबांनी मराठवाड्यातील अति दुष्काळी बीड जिल्ह्यात वैद्यकीय व तंत्रशिक्षणाच्या ज्ञानगंगाची सुरुवात केल्यामुळे विद्यार्थ्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध झाले आहे. यामुळे आज संस्थांतर्गत शिकत असलेले असंख्य विद्यार्थी *शिक्षणमहर्षी मा. श्री. सुभाषचंद्रजी (भाऊ) सारडा साहेब* यांचे शतशः ऋण व्यक्त करत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपल्या निःस्वार्थ सेवेने चालू असलेले कार्य आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे आहे. 
*मा. श्री. भाऊसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!*
आपले कार्य समाजातील प्रत्येक  विद्यार्थी, तरुण युवावर्ग यांना नवा उत्साह व प्रेरणा निर्माण करत आहे. आपली दृष्टी, कष्ट आणि समाजासाठी केलेली निस्वार्थ सेवा आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. आपण ज्या पद्धतीने सहकार, शिक्षण आणि समाजसेवा यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. आपल्याला दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*-:शुभेच्छुक:-*
*प्रा. अशोक सवासे*
*आदित्य शिक्षण संस्था, बीड.*

*गावठी कट्टा बाळगणारा 17 वर्षीय बालक ताब्यात. दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काढतुस हस्तगत. लातूर स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई.*

       लातूर  (पोअका) : लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी आगामी सन उत्सव च्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून  कार्यवाही करण्यात येत असताना, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच दिनांक 29/03/2025 रोजी गांधी मार्केट परिसरातून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन गावठी कट्टे (पिस्टल) हस्तगत करण्यात आले.
        स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर  1) 17 वर्षीय विधी संघर्ष बालक, राहणार मांजरी, तालुका जिल्हा लातूर, सध्या राहणार गोकुळ नगर पठार, वारजे माळवाडी, पुणे  2) व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुरे, राहणार सहयोग नगर, दत्त मंदिराजवळ, गोकुळ पठार, वारजे माळवाडी, पुणे.(फरार) असे असून विधी संघर्ष बालकाकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काढतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाणे गांधी चौक येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास  गांधी चौक पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
       स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलपटे , तुराब पठाण, नवनाथ हासबे, पाराजी पुठ्ठेवाड,युवराज गिरी, राजेश कचे, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांनी केली आहे.

लातूर शहर मनपा आयुक्तत तथा प्रशासक हेच डॉ. आंबेडकर पार्क पुतळा निर्मितीत अडसर !

      लातूर  (दैलाप्रप्र) : लातूर शहर सर्वांगीण क्षेत्रात विकसित असे अग्रेसर ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क व पुतळा असून समोरच यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने लातूर महानगरपालिकेचा कारभार चालतो आहे. लातूर मनपात कोठे काय घडते आहे त्यावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा आहे, पण लातूर महानगरपालिकेचा कारभार काही सुरळीत चालत नाही अशी ओरड नेहमीच असते. 
      माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी  खुर्ची स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा पुतळा बसवण्याची मंजुरी आणली, प्रतिष्ठापना झाली, पण पुतळा निर्मितीसाठीचा निधी मनपा लातूरकडे वर्ग केला अशी चर्चा आहे. मात्र पुतळा उभारणीसाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक हे अडसर करत आहेत, ते राजकीय दबावत आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होताना दिसते आहे. 
      लातूर मनपा आयुक्त तथा प्रशासक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून शासकीय सेवे मार्फत जनसेवा करीत असल्याचे बोलले जाते,  पण मागासवस्त्या, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरणाच्या विरोधातच कसे काय अशीच उलट सुलट कुजबुज लातूर शहर व लातूर मनपा वर्तुळात होताना दिसते आहे.

*किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या भिकाऱ्याला काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.*

 
        लातूर  (पोअका) : दिनांक 13 ते 14 मार्च रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहाटपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खुनाचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत होता.
       पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून तात्काळ तपासाची सूत्रे हलविण्यात आली.
       स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने काही तासातच अनोळखी मयताची ओळख पटवून तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्याआधारे चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केलेल्या  आरोपीला क्रीडासंकुलच्या गेट समोरून 14 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले असून नमूद आरोपीचे नाव
1) देविदास शेषेराव सोनकांबळे, वय 54 वर्ष, राहणार खाडगाव रोड, प्रकाश नगर, चंद्रोदय कॉलनी, रोड क्रमांक 5, लातूर असे असून सांगून तो दिवसभर भिक्षा मागून खातो. दुपारी तंबाखू घेण्या देण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून नमूद मध्यरात्री चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेला इसम नामे प्रकाश लिंबाजी भडके, वय 58 वर्ष, खाडगाव रोड, लातूर. याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबूल केले आहे. 
       स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच दिवसभर भिक्षा मागून खाणाऱ्या व किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या नमूद आरोपीला काही तासातच जेरबंद केले असून पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.
      सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, विनोद चलवाड, सचिन मुंढे यांनी केली आहे.

*महिला तक्रार निवारण समिती गठीत न केल्यास भरावा लागेल ५० हजार रुपये दंड *

        लातूर (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची सखोल चौकशी व त्याचे निराकरण करण्यासाठी आस्थापनामध्ये तक्रार निवारण समिती गठीत न केल्यास ५० हजारांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तक्रार निवारण समिती गठीत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ च्या कलम ४ (१) नुसार कार्यालयांतर्गत येणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची सखोल चौकशी व त्याचे निराकरण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. 
     एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला ५० हजार रुपये दंड आकारणे, तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे. 
      शासकीय, निमशासकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शासकीय कंपनी किंवा खासगी उपक्रम, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य आदी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषागृहे, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुले, एमआयडीसी, धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग, कामगार कल्याण, शिक्षण विभाग, शासकीय, निमशासकीय व खासगी शिक्षण संस्था, नगरपालिका, सहकार विभाग, बँकिंग विभाग, सहकारी पतसंस्था, पतपेढी, शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, शॉपिंग मॉल, व्यापारी महामंडळ, मार्केट किमती, कोचिंग क्लासेस आदी ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करावी लागणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****

*रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक. औसा पोलिसाची कारवाई.*

      
        लातूर (पोअका) : रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक. औसा पोलिसाची कारवाई कली असून , दिनांक 4 मार्च 2025 च्या मध्यरात्री एका अज्ञात आरोपीकडून औसा शहरातील एका दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये सदरचा भिकारी जळून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर औसा व त्यानंतर लातूर येथील रुग्णालयात उपचार चालू असताना त्याने दिलेल्या फिर्यादीवरून 05 मार्च रोजी पोलीस ठाणे औसा येथे दिनांक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
        पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांचे पथकाने गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करून गोपनीय माहिती मिळवून रस्त्यावर दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळणार्‍या आरोपीला निष्पन्न केले असून त्याचे नाव 
1)योगेश सिद्राम बुट्टे, वय 35 वर्ष, राहणार अन्नपूर्णा नगर, औसा.
असे असून त्यास दिनांक 7 मार्च 2025 रोजी त्याचे राहते ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. भिकाऱ्याने आरोपीला शिवी दिल्याचा राग मनामध्ये धरून रात्री रोडवर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले आहे.
      वरिष्ठांच्या मार्गदर्शनात औसा पोलिसांनी अतिशय कुशलतेने गुन्ह्याच्या तपास करून अज्ञात आरोपीला 24 तासाच्या आत निष्पन्न करून गुन्ह्यात अटक केली आहे.   वरिष्ठांचे व पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस अंमलदार गुट्टे, रतन शेख, समीर शेख, मुबाज सय्यद, बालाजी चव्हाण, पडीले,गोमारे यांनी केली आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*अनोळखी मृत व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन

       लातूर,दि.1,(जिमाका):-  उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमृ नंबर 21/2025 कलम 144 बीएनएसमधील अनोळखी 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती अंगात र...

लोकप्रिय बातम्या